NGN News
Latest Marathi News

विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या एस्सेल समूहाची रोमांचक 100 वर्षे पूर्ण

  • स्टार्ट-अप आणि उद्योजकीय ऊर्जेचा प्रभावी वापर 
  • 1926 मध्ये स्थापन झालेल्या एस्सेल ग्रुपने पॅकेजिंग, अम्युझमेंट पार्क्स, घरगुती मनोरंजन, बातम्या, कन्टेन्ट, पायाभूत सुविधा, स्थावर मालमत्ता, शिक्षण, तंत्रज्ञान, लाइफस्टाइल आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत भारतीय व्यावसायिक विश्वात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.
  •  10 दशलक्षांहून अधिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून राष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिलेल्या या समूहाने, इतिहासात एक गौरवशाली अध्याय लिहिला आहे.

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

बहुआयामी भारतीय व्यावसायिक समूह एस्सेल ग्रुपने गौरवशाली 100 वर्षे पूर्ण करून आपल्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 1926 मध्ये आदमपूर नावाच्या एका छोट्या शहरात झालेल्या सुरुवातीपासून ते विविध व्यवसायांमध्ये विस्तारलेल्या बहुआयामी समूहापर्यंतएस्सेल ग्रुपने जगभरात एक कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे.

1967 पासूनएस्सेल ग्रुपने एका पारंपरिक व्यवसायातून स्टार्ट-अपमध्ये स्वतःला रूपांतरित करत जागतिक समूहामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आणि स्वतःला नव्याने घडवले आहे. ग्रुपच्या मुळातील पारंपरिक वस्तूंच्या व्यापाराचा व्यवसाय लष्करी पुरवठा आणि सीमेपलीकडील व्यापाराकडे वळवण्यात आला. विशेष म्हणजेअनेक व्यवसायांची सुरुवात ही या ग्रुपने केली असूनउद्योगातील अनेक गोष्टींची सुरुवात ही त्यांच्या नावावर आहे. महत्त्वाचे म्हणजे आपली स्टार्ट-अप मानसिकता जोपासत आणि नफ्यावर बारकाईने लक्ष केंद्रित करतज्या व्यवसायांनी अपेक्षित मूल्य-वितरणाची पातळी गाठली नाहीअसे काही व्यवसाय बंद करण्यास ग्रुपने कधीही मागेपुढे पाहिले नाही.

स्वर्गीय राम गोपाल जी यांनी स्थापन केलेलात्यांचे सुपुत्र श्री जगन्नाथ जी गोएंका यांनी विस्तार केलेल्या या व्यवसायाला श्री. नंद किशोर जी यांनी भक्कम पाठिंबा दिला. दूरदृष्टी लाभलेल्या डॉ. सुभाष चंद्रा आणि त्यांचे बंधू – लक्ष्मी नारायणजवाहर आणि अशोक गोयल यांनी यशस्वीपणे नेतृत्व केलेला एस्सेल ग्रुप हा मोजक्याच भारतीय व्यावसायिक समूहांपैकी एक आहेजो आपली समृद्ध परंपरा सहाव्या पिढीकडे यशस्वीपणे हस्तांतरित करत आहे – आणि विशेष म्हणजेया समूहाची चौथी आणि पाचवी पिढी आजही सक्रिय आहे.

गेल्या शतकादरम्यानया समूहाने पॅकेजिंगगृह मनोरंजनमनोरंजन उद्यानेवृत्तसेवाआशय वितरणपायाभूत सुविधास्थावर मालमत्ताशिक्षणतंत्रज्ञानजीवनशैली आणि अशा विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आपला विस्तार केलाज्यामुळे 190 हून अधिक देशांमधील अब्जावधी लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. केवळ उदारीकरणापूर्वीच्या काळात भारतीय व्यावसायिक क्षेत्राची उभारणी करण्यातच या समूहाने योगदान दिले नाहीतर देशाचे भौतिक सामर्थ्य आणि सॉफ्ट पॉवर म्हणजेच सांस्कृतिक व सामाजिक प्रभाव लक्षणीयरीत्या वाढवून देशाच्या आर्थिक विकासालाही बळकटी दिली आहे. केवळ काही कंपन्याच नव्हेतर संपूर्ण उद्योगक्षेत्रे उभी करणाऱ्या आपल्या पथदर्शी उपक्रमांच्या माध्यमातूनएस्सेल समूहाने आपल्या शतकातील वाटचालीचा ठसा उमटवला आहेआणि या प्रक्रियेत त्यांनी देशभरातील 1 कोटींहून अधिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.

या विशेष प्रसंगी डॉ. सुभाष चंद्रा म्हणाले, “एस्सेल ग्रुपचा प्रवास हा चिकाटीलवचिकतानावीन्य आणि प्रगतीचा राहिला आहे. व्यावसायिक प्रगती ही  समाजासाठी आणि राष्ट्रासाठी मूल्यवर्धक ठरली पाहिजेया आमच्या विश्वासानेच ग्रुपने व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात उचललेल्या महत्त्वपूर्ण पावलांना मार्गदर्शन केले आहे. मला आणि माझ्या बंधूंना 100 वर्षांचा हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करताना अत्यंत अभिमान वाटतो. पिढ्यानपिढ्यांची दूरदृष्टी आणि अज्ञात क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या धैर्यातूनच हा टप्पा उभारला गेला आहेज्यामुळे जवळपास प्रत्येक उद्योगच खऱ्या अर्थाने शतकपूर्तीचा ठसा उमटवतो आहे. आपल्या राष्ट्रासोबतच एस्सेल ग्रुपचा विकास झाला आहे आणि मला हे सांगताना अभिमान वाटतो कीआपण सर्वांनी मिळून आर्थिक मूल्य निर्माण केले आहे आणि राष्ट्रीय प्रगतीला चालना देण्यासाठी सामाजिक परिवर्तन सक्षम केले आहे.”

हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करतडॉ. चंद्रा यांनी आज आयोजित केलेल्या एका विशेष टाऊनहॉलमध्ये एस्सेल ग्रुपच्या जगभरातील 10,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना संबोधित केले. या अत्यंत अनौपचारिक वातावरणात डॉ. चंद्रा यांनी ग्रुपच्या ऐतिहासिक प्रवासावर प्रकाश टाकला आणि हा समृद्ध वारसा पुढे नेण्यात तसेच व्यवसाय भक्कमरित्या उभारण्यात कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या मोलाच्या भूमिकेची दखल घेतली. आपल्या भाषणातडॉ. चंद्रा यांनी ग्रुपने आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून जगभरात व्यापक सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. अनेक दशकांपासून ग्रुपच्या प्रवासाचा भाग असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथाही त्यांनी सांगितल्या. भारतातील पहिली स्टार्टअप कंपनी म्हणूनएस्सेल ग्रुप भविष्यासाठी नवनवीन शोध लावत आणि धाडसी पावले उचलत असल्याचा पुनरुच्चार डॉ. चंद्रा यांनी केला. तसेचपुढील शतकाचे निर्माते म्हणून उद्योजकतेची भावना जोपासण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.गेल्या 100 वर्षांतया समूहाच्या योगदानाने भारताच्या आर्थिक आणि सामाजिक पटलावर एक अमिट ठसा उमटवला आहे.

Comments are closed.