NGN News
Latest Marathi News

वावी येथे उद्यापासून रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह

  • नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी ; जगद्गुरु संत तुकाराम महाराज चरित्र कथा आणि ज्ञानयज्ञ

** संतोष बिरे

वावी : एनजीएन न्यूज नेटवर्क

सिन्नर तालुक्यातील वावी येथे सिद्ध योगी सद्गुरु गंगागिरीजी महाराज व वै रामगिरी महाराज वावीकर यांच्या संयुक्त पंचविसाव्या पुण्यतिथी रोप्य महोत्सवी निमित्त उद्या शुक्रवार दि. 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर या काळात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रामगिरी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह भ प कीर्तन केसरी पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांनी दिली. गेल्या 24 वर्षापासून वावी येथील सिद्ध योगीराज सद्गुरु लक्ष्मण गिरी महाराज यांच्या संजीवन समाधी मठ या प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताह होत आहे यावर्षी सप्ताहाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांच्या श्रवणातून कीर्तनाचा लाभ घेण्याची मांदियाळी भाविकांना मिळणार आहे.

दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे काकडा भजन सकाळी सहा वाजता शिवमहिमा विष्णु सहस्रनाम व गीता पाठ नऊ वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा पाठ दुपारी दोन वाजता तुकाराम महाराज चरित्र कथा व त्यानंतर सामुदायिक हरिपाठ व सायंकाळी सहा ते आठ रोज हरी किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम त्यानंतर रात्री नऊ ते 11 रोज संगीत भजनाचा कार्यक्रम होईल आदी कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानने केले आहे.

या सप्ताहाचे उद्घाटन शाई मिरवणुकीने होणार असून यामध्ये भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज कोपरगाव आश्रमाचे परमपूज्य रमेश गिरी महाराज परमपूज्य भोले गिरीजी महाराज योगानंद सरस्वती जी महाराज महंत गणेश नंद सरस्वती महाराज यांच्यासह अनेक साधुसंत या शाही मिरवणुकीस उपस्थित राहणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान पांडुरंग गिरी महाराज वावीकर सह ग्रामस्थांनी केले आहे.

दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत कीर्तन होणार यामध्ये शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक पांडुरंग महाराज घुले संदिपान महाराज शिंदे अर्जुन महाराज लाड चंद्रशेखर महाराज देगलूरकर व चैतन्य महाराज देगलूरकर यांच्यानंतर शेवटी 19 डिसेंबर रोजी काल्याचे किर्तन हिंदू सम्राट ह भ प बंडातात्या कराडकर यांच्या सुश्राव्य अशा वाणीतून होणार आहे. यावेळी साधारणता एक लाख भाविकांची उपस्थिती राहणार असल्याचे रामगिरी महाराज प्रतिष्ठानचे संचालक ह भ प श्रीकृष्ण महाराज गिरी गोसावी यांनी दिली आहे. याच कार्यक्रमांमध्ये सात दिवस कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये राज्यभरातील कृषी स्टॉल धारक येणार आहे. त्यासाठी व्यवस्था देखील केली आहे शेतकऱ्यांना शेतीमाला विषयी दररोज माहिती यातून मिळणार आहे.

Comments are closed.