ओझर : अमर आढाव
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने प्रतिवार्षिक वृक्षारोपण करण्यास प्रारंभ करण्यात आला. राज्यभरातील व राज्याबाहेरील विविध १०८ आश्रमात वृक्षा रोपण करण्यास प्रारंभ झाला असून ओझर येथील जनशांती धाम आश्रम परिसरात देखील १११ वृक्षरोपण करण्यात आले.
देव देश आणि धर्मासाठी अविरत कार्य करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वेरुळ, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, काशी, ओझर, खलघाट, रत्नागिरी येथील नरवण या प्रमुख आश्रमांसह सह महाराष्ट्र व राज्या बाहेरील एकूण १०८ आश्रमात प्रतिवर्षी वृक्षारोपण करण्यात येत असते.यावर्षी देखील भक्त परिवाराच्या एकूण १०८ आश्रमात फुले व फळे व इतर वृक्ष रोपांची लागवड करण्यात येत आहे.भक्त परिवाराच्या वतीने तीन वर्षापूर्वी देशभरातील विविध भागात एकाच दिवशी पाच लाख वृक्ष रोपांची लागवड करण्याचा विक्रम केला होता. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे व या राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी व्हावे असे आवाहन जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे. झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना घेऊन वृक्षारोपण मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा ध्यास जय बाबाजी भक्त परिवाराने घेतला आहे.अधिकाधिक वृक्ष लागवड करून हरितसंपदा निर्माण करण्याचा जय बाबाजी भक्त परिवाराचा मनोदय आहे.
————–
ओझर आश्रमात १११ वृक्षरोपांची लागवड..
ओझर आश्रमातील देवभूमी जनशांती धाम परिसरात अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत १११ वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.आणि वृक्ष संवर्धनाचा संकल्प देखील करण्यात आला.यावेळी आश्रमीय संत रवींद्रानंद महाराज,शिवाशेठ सोनवणे,पत्रकार अमर आढाव,कैलास पाटील,संतोष अनवट,कृष्णा सोनवणे, सुदर्शन सागजकर,कार्तिक शेळके, शिवम होले,रवींद्र शेजवळ,संकेत पाटील,कमल मिश्रा,प्रदीप धोंडगे यांसह सेवेकरी उपस्थित होते.