NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘आयएचपीएल’कडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५०० नवीन रोपांची लागवड

0

इगतपुरी : इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड (आयएचपीएल) या कंपनीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुंबई-नाशिक महामार्गावर विशेष वृक्षलागवड मोहीम राबवली. ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘एक पेड माँ के नाम २.०’ अभियानाशी सुसंगत होती. या उपक्रमातून नागरिकांना त्यांच्या मातांच्या सन्मानार्थ झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातून पर्यावरण रक्षणासोबतच सांस्कृतिक मूल्यांचाही जागर होतो आणि हरित व शाश्वत भविष्यासाठी जनचळवळीला चालना मिळते.

महामार्ग हिरवागार करण्यासाठी ‘आयएचपीएल’कडून सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. उदाहरणार्थ, डिसेंबर २०२४ पासून आतापर्यंत कंपनीने मुंबई-नाशिक महामार्गावरील मधल्या पट्ट्यांवर व कडेला एकूण ११,००० झाडांची लागवड केली आहे. ही वृक्षलागवड दरवर्षी नियमित राबवली जाते. त्यामुळे परिसरातील हरित क्षेत्र व पर्यावरणीय आरोग्य वृद्धिंगत होते.
ही झाडे अनेक कारणांसाठी उपयुक्त ठरतात, उदा. नाल्यांभोवतीची माती झाडांमुळे स्थिर राहते व मुसळधार पावसात पाणी साचण्याचे प्रमाण कमी होते; रस्त्याच्या दुभाजकांवर लावलेल्या झाडांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईट्सचा झोत कमी होतो व रात्रीच्या वेळी वाहन सुरक्षितपणे चालवता येते. यंदा लावलेली नवीन रोपे ही पूरप्रवण भागात मातीची धूप कमी करून पूर नियंत्रणात मदत करतील व महामार्गाच्या सौंदर्यात भर घालतील.

हा प्रकल्प प्रामुख्याने सपाट व उताराच्या भागांत राबविण्यात आला आहे. कसारा घाट डोंगराळ भागात असल्याने या प्रकल्पात घाटाचा अपवाद करण्यात आला आहे. ठाणे, कल्याण, पुणे, अहमदनगर व पालघर या प्रमुख जिल्हांच्या सीमांमध्ये महामार्गाचे प्रभाव क्षेत्र पसरलेले असून, वाहतूक, औद्योगिक पाईप निर्मिती व खाण उद्योगांसाठी तो एक महत्त्वाचा दुवा आहे. पडघा व शहापूर परिसरात अनेक नवीन वेअरहाऊस प्रकल्प उभे राहत असल्याने हा मार्ग गोदाम केंद्र म्हणूनही उदयास येत आहे.
‘आयएचपीएल’च्या या वृक्षलागवड उपक्रमामुळे मुंबई-नाशिक महामार्ग राष्ट्रीय पर्यावरणीय उद्दिष्टांशी सुसंगत असलेला आदर्श हरित मार्ग म्हणून उभा राहत आहे. शाश्वत पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी या नात्याने, आयएचपीएल हे सुनिश्चित करत आहे की या महामार्गाचा प्रत्येक किलोमीटर विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी यामधील समतोलाचे प्रतीक ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.